लोक काय म्हणतील..........

तू हसतील तर ते जळतील
तू रडलीस तर ते हसतील
काही नवं केलं तर पाप म्हणतील
जुन्यात अडकून राहिली तर श्राप म्हणतील......

गमावलं तर दरिद्री म्हणतील
कमावलं तर माज म्हणतील
पुढे निघालीस तर मागे ओढतील
मागे राहिलीस तर तुडवतील........

तू हात दिला तर साथ म्हणतील
तू तुझाच विचार केला तर स्वार्थ म्हणतील
कौतुक केलं तर वाह म्हणतील
उणीव दाखवली तर जा म्हणतील


काही केलं तर...... काय केलं ?म्हणतील
नाही केलं तर...... काय केलं? म्हणतील
म्हणूनच  ..........
तू जग तुला हवं तसं ......
जगाचा काय?
ते काहीही म्हणतील.......

Comments

Popular posts from this blog

जीवनात वाचनाचे महत्त्व

वृक्षतोड एक समस्या

आयुष्य जगण्याची  पद्धत